Thursday, November 18, 2010

झाशीची राणी लक्ष्मीबाई

सिंहासन हिल उठे राजवंशों ने भृकुटी तानी थी,
बूढ़े भारत में आई फिर से नयी जवानी थी,
गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी,
दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी।
चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।


माहेरच नाव : मणिकर्णिका मोरोपंत तांबे
सासरच नाव : राणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर
टोपणनाव : मनु, छबिली, बाई-साहेब

महाराष्ट्रातील पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला असणार्‍या मोरोपंत तांबे यांची ही मुलगी! हे मोरोपंत तांबे मूळचे (जळगाव जिल्ह्यातील) पारोळ्याचे. महाराष्ट्रीय माता-पित्यांच्या (वडील-मोरोपंत; आई- भागीरथी बाई) पोटी काशी येथे जन्मलेल्या मनुने, पुढे शूरवीर झाशीची राणी बनून ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून अढळ स्थान प्राप्त केले.
दुसर्‍या बाजीरावांकडे आश्रयाला असणार्‍या मोरोपंतांच्या मनुला मातृसुख लाभले नाही. वयाच्या ३-४ थ्या वर्षीच आई वारल्याने मनु नेहमी आपल्या वडिलांबरोबरच असे. नानासाहेब पेशवे, रावसाहेब पेशवे या दुसर्‍या बाजीरावांच्या दत्तक मुलांबरोबरच मनु ब्रह्मावर्त येथे वाढली. मोठे, पाणीदार डोळे असणारी ही मोहक कन्या दुसर्‍या बाजीरावांचीच नव्हे तर सर्वांचीच लाडकी होती. बाजीरावाने तिला स्वत:च्या मुलीसारखे वाढवून लिखाण-वाचनाबरोबरच मर्दानी शिक्षणही दिले. एवढेच नव्हे तर ब्रह्मावर्तामधल्या कार्यशाळेतून, आखाड्यांमधून राणीने अश्र्वपरीक्षा, घोडेस्वारी, तलवारबाजी, बंदुक चालविणे, पिस्तुले, जांबीया चालवणे यांचेही शिक्षण घेतले.
धोरणी, चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाई मूळच्या कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या. पण राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणार्‍या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या.
ब्रिटिशांनी राणींचा उल्लेख `हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क' असा केला. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्य, पोवाडे रचले गेले. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधिस्थानावर १९६२ मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. ते समाधिस्थान पाहिल्यानंतर कविवर्य भा. रा. तांबे यांनी पुढील यथार्थ ओळी सुचल्या.
``रे हिंद बांधवा, थांब या स्थळी। अश्रू दोन ढाळी।।
ती पराक्रमाची ज्योत मावळे । इथे झांशीवाली।।


Friday, October 29, 2010

फेसबुकचा रंग निळा का? (Why Facebook having Blue Colour?)



फेसबुक चे आतापर्यंत ५०० मिलियन पेक्षा जास्त युझर आहेत
साईन-अप पेजपासून ते लोगोपर्यंत सर्व काही निळं. मोबाईल अप्लिकेशन आणि पॉपअप होणारे डायलॉग विंडोही निळेच ! असं का?
दूरचित्रवाणीवरील ट्विग या प्रसिद्ध कार्यक्रमात लिओ लापोर्टने फेसबुकचा सहनिर्माता मार्क झुकरबर्ग याची कथा सांगितली. या कार्यक्रमामुळंच फेसबुक निळं का याचा उलगडा होतो. मार्क हा रंगांधळा आहे, पण त्याला निळा रंग स्पष्ट दिसतो. अन्य रंगच दिसत नसल्यानं, त्यानं फेसबुकचं डिझाईन निळ्या रंगातच असावं, असा आग्रह धरला होता.

रंगांचा मार्कवर काहीच परिणाम होत नाही. निसर्गातील रंगांची उधळण त्याला समजत नाही. परंतु, आकाशाचा निळा रंग त्याला सहज दिसतो. काही वर्षांपूर्वी त्यानं स्वतःचीच रंगांची ऑनलाईन टेस्ट घेतली आणि त्याच्या लक्षात आलं, की आपल्याला लाल आणि हिरवा रंगच दिसत नाही. निळा रंग हा माझ्यापुरता उत्कृष्ट आणि एकमेव रंग असल्यानं, मी निळा रंगच निवडला, असं मार्कनं या परीक्षणानंतर सांगितलं. त्याशिवाय वेब डिझाईनमध्ये निळ्या रंगालाच बहुतेकांनी प्राधान्य दिल्याचं दिसतं.

निळ्या रंगाची उधळण करण्यात केवळ फेसबुकच आघाडीवर आहे, असं नाही. जगातील पहिल्या शंभर संकेतस्थळांनीही निळ्या रंगालाच प्राधान्य दिलंय. त्या खालोखाल प्रभाव आहे तो लाल रंगाचा. फेसबुकनं निळा रंग स्वीकारण्याचे आणखी एक कारण हे त्यांच्या सुनियोजित मार्केटिंगशी निगडित आहे. बहुतेक रंगांकडे मानवी डोळे आकृष्ट होतात आणि तिथंच खिळून राहतात. मात्र, निळा रंग हा डोळ्यांसाठी पारदर्शकतेचं काम करतो. त्याशिवाय हा रंग आणि हिरवा रंगही मेंदूसाठी निर्वाणाचा म्हणून मानला गेलाय. अखेर त्यांनी या रंगाची केलेली निवड ही केवळ भावनेच्या आधारावर केलेली नाही, हे त्यातून स्पष्ट होतं.

Tuesday, October 12, 2010

राजे या जगात जगाव लागत.....


लाज वाटते राजे, या जगात जगाव लागतं
समाजाच अध:पतन, उघड्या डोळ्यांनी बघाव लागतं
नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत.....

कायदा सुव्यवस्थेला कुणी भीत नाही राजे,
सुभेदाराची सूनही इथे सुरक्षित नाही राजे,
आया,बहिणी,लेकी,सुना पवित्रा राहिली नाहीत नाती,
शासन करणार्या तलवारींची गंजून गेलीत पाती,
आपल्या अब्रुच लक्तर,अब्रू झाकण्यासाठीच मागाव लागत
नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत

हिंदवी स्वराज्य स्थापन करून तुम्ही निघून गेलात राजे,
राष्ट्रप्रेमाच स्फुलिंग पेटवून तुम्ही निघून गेलात राजे,
पण......या पेट्लेल्या राष्ट्रप्रेमावर स्वत:ची पोळी भाजणार्या
आणि आमचीच मतं घेऊन, शेवटी सत्तेने माजणार्या
गल्ली बोळातल्या पुढार्याला, "रयतेचा राजा" म्हणाव लागत,
नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत.....

इंग्रज इथं दीडशे वर्षे राज्य करून निघून गेले,
भारतीयांच काय पाणी,ते भारतात राहून बघून गेले
भारतीय संस्कृतीच्या छाताडावर, आता पाश्चात्य संस्कृती नाचतेय,
महाराष्ट्रीयन तुतारीच्या नावाखाली, इथं इंग्रजीचीच पिपाणी वाजतेय,
माय मराठी मरतेय राजे आणि इंग्रजीला पालखित बघाव लागत
नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत........

जांच्याकडे पैसा आहे, त्यांच जगण झालय मस्त,
नि पोटासाठी राबणार्याच इथं मरण झालय स्वस्त,
किड्यामुंग्यांसारखी इथं जगताहेत माणसं,
दिवसाढवळ्या आपल मरण बघताहेत माणसं,
वेदना असह्य होतात, म्हणून इच्छामरण मागाव लागत....
नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत......

तुमच्यासारखा छत्रपती पुन्हा इथं झाला नाही,
पुन्हा कुठल्या जिजाऊपोटी शिवबा जन्माला आला नाही,
घराघरातल्या जिजाऊ आता करियर वुमन होत आहेत,
आता एक करा राजे यापुढे प्रेरणा कुणाला देऊ नका,
अंन् कृपा करून तुम्ही आमच्या स्वप्नातही येऊ नका.
काय सांगू राजे, आता इथल्या तरुणाईबद्दल बोलवत नाही.
नी तुमच्या आदर्शांच ओझ, इथल्या तरुण खांद्याना पेलवत नाही
कर्तव्य विसरून आमची तरुणाई, आपल्याच मस्तीत मग्न आहे.
नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत......

अन्याय, अत्याचार, अधर्मावर इथल्या माणसाच जिवापाड प्रेम जडलाय,
आणि हिंदुपतपातशाहीवर राजे, दहशदवादाच सावट पडलय ,
बॉम्बस्फोटाच्या भीतीने,वारा सुगंध देत नाही,
नी आपल्याच मातृभूमीत राजे, मोकळा श्वासही घेता येत नाही,
गुंड सुटतात मोकाट आणि निर्दोषांना वर्षानुवर्ष न्यायालयात लढाव लागत
नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत......

स्वराज्य आहे इथं राजे,पण सुराज्याची पर्वा नाही,
म्हणतात ना..... कौरव सारे माजले आहेत आणि पांडवांची सत्ता नाही.
विरोध करण्याची हिंमत जाउन निष्क्रियता पक्की मुरली आहे
माझीही तलवार बोथट झालिये आता फक् शब्दांनाच धार उरली आहे,
समाज परिवर्तनाच चक्र इथं दुबळ्या हातांनाच फिरवावी लागतात
नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत.....

ताठ मानेंन जगाव म्हटल तर राजे आपलीच माणसं जगू देत नाहीत,
आणि भ्रष्टाचारमुक्त, अखंड भारतच स्वप्न पाहु देत नाहीत,
तरी बर तुमचच रक्त वाहताय, माझ्या नसांनसांमधून म्हणून लिहाव लागत
पण तरीही लाज वाटते राजे या जगात जगाव लागत.....

जातील राजे नक्की जातील, हेही दिवस एक दिवस,
स्वताच्या चुकांची जाणीव होईल प्रत्येकालाच एक दिवस,
मात्र त्यासाठी प्रत्येकाने, प्रयत् करायला हवेत,
बूडणार्याला काडिशिवाय, दुसरं काय लागतं तरायला?
पुन्हा एकदा त्याच डौलान, भगवा झेंडा फडकणार,
कुणाच्याही चिथावनीने, आमची माथी नाहीत भडकणार...

जय भवानी!!!
जय शिवाजी!!!
जय महाराष्ट्र........
जय भारत.............

Saturday, September 25, 2010